• English
  • मराठी

“जो देश आपला इतिहास विसरतो, तो इतिहास घडवूही शकत नाही”

“जो देश आपला इतिहास विसरतो, तो इतिहास घडवूही शकत नाही” या वाचनाची दखल घेत ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष करणे उचित नसल्याने इतिहास व संस्कृतीची कास धरत बेलापूर किल्ला सुशोभिकरणाच्या कार्याचा शुभारंभ करण्यात आला. मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा बेलापूरचा किल्ला हे आपले वैभव असून त्याचे येणार्‍या पिढ्यांसाठी जतन करणे आवश्यक आहे. या प्रसंगी शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, संभाजी महाराज, बाळ राजाराम महाराज यांच्या वेशभूषा धारण केलेल्या कलाकारांनी उपस्थितांची दाद मिळवत कार्यक्रमास साजेशी ऐतिहासिक वातावरण निर्मिती केली. किल्ल्याचे संवर्धन व सुशोभिकरण केल्याने नवी मुंबईतील ऐतिहासिक व पर्यटन स्थळाची उणीव नक्कीच भरून निघेल.