• English
  • मराठी

क्रांतीच्या मशाली आज प्रज्वलीत करण्यात आल्या. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, ही मागणी समजून घेण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी आज क्रांती दिनाचे औचित्य साधत जासई येथे मशाल मोर्चा काढण्यात आला.
याच पार्श्वभूमीवर आज ग्रामीण भागात, तालुक्यात शहरात संध्याकाळी ठिकठिकाणी मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.
दि. बा. पाटील यांच्या अलौकिक कार्याची प्रेरणा घेऊन, आपला नामकरणाचा लढा यशस्वी करणे, हाच हेतू ध्यानात घेऊन या क्रांतीच्या मशाली आज प्रज्वलीत करण्यात आल्या.