• English
  • मराठी

पाली-देवद जिल्हा परिषद निवडणूकीवेळी दिलेल्या वचनाची अखेर पूर्ती !!

पनवेल तालुक्यातील गाढी नदीवरील विचुंबे गाव ते नवीन पनवेल यांना जोडणार्‍या नव्या पुलाच्या उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे वचन पाली-देवद जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी मी दिले होते. निवडणुकीवेळी दिलेल्या या वचनाची पूर्ती करण्यासाठी पुढाकार घेऊन विचुंबे ग्रामपंचायत आणि पनवेल मधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे मिळून मी एक शिष्टमंडळ तयार केले. याच शिष्टमंडळासह मी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांची भेट घेतली व नव्या पुलाच्या उभारणीसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, यासाठी लेखी निवेदन सादर केले. या पुलाच्या उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्रालय सकारात्मक असून यावेळी सन्माननीय मंत्री महोदयांनी पुलाच्या उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले. त्यामुळे पाली-देवद जिल्हा परिषद निवडणूकीवेळी मी नागरिकांना दिलेल्या वचनाची लवकरच पूर्ती होणार आहे.