![1](https://www.prashantthakur.in/wp-content/uploads/2020/11/20201123123344_6C2A3064_1-690x460.jpg)
लॉकडाऊनमुळे आधीच तणावाखाली आर्थिक संकटात असलेल्या जनतेला सरकारने मोठ्या वीजबिलांचा शॉक दिला आहे .. याबाबत जनआक्रोश निर्माण झाल्यावर सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी जाहीर केले होते. पण आता
वीज बिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावी लागतील, असे हे सरकार सांगत आहे
तर महावितरण सक्तीने वीजिबले वसूल करत आहे, यात सामान्य जनता मात्र त्रस्त झाली आहे.
या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी आणि सामान्य जनतेला या वीजबिलापासून दिलासा देण्यासाठी वीज बिलवाढीविरोधात आंदोलन !